Posts

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

Image
  राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान माणूस नावाचा प्राणी शेवटपर्यंत माणसाला कळला तर ते जगातील सर्वात मोठे संशोधन असेल! कितीही प्रयत्न केले तरी माणसातील विकार संपतील का? हा प्रश्न अनेक महामानवांनी, दर्शनीकांनी उपस्थित केलेला आढळून येतो. माणूस मोठा स्वार्थी आणि मतलबी असल्यामुळे त्याने आत्तापर्यंत सृष्टीतील सर्वच गोष्टींचा केवळ त्याच्या स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. त्यातच एखाद्या महापुरुषाला देव केले, त्याची मूर्ती करून मंदिरात प्रतिष्ठापना केली, त्याची पूजा - अर्चा, आरती झाली की माणूस त्याला हवं तसं काम करायला आणि त्या मूर्तीचा हवा तसा उपयोग करायला मोकळा! कोणत्याही गोष्टीचे धर्माच्या नावाखाली भावनिक चित्रण केलं की भोळी, भाबडी, साधी, निरागस, देवाला भिनारी बिचारी माणसं देवाच्या नावाखाली जे सांगाल ते ऐकायला आणि करायला तयार. असं असलं तरी आज राज्यात होणाऱ्या किळसवाण्या घटना पाहून मन प्रचंड व्यथित होतं. उच्चशिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबातील आणि विविध राजकीय आणि शासकीय पदावर असलेल्या लोकांनी आपला विवेक अक्षरशः थोतांड आणि कर्मकांड या समोर गहाण टाकलेला पाहून मन विषन्न, व्यथीत होत...

प्रज्ञावंत प्रेषित: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

Image
  प्रज्ञावंत प्रेषित: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम         जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर म्हणतो, "काही माणसं जन्मताच महान असतात, काही कठीण परिश्रमाने महानता प्राप्त करतात आणि काहींवर महानता लादली जाते." या व्यक्तीमत्वापैकी दुसऱ्या वर्गात बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! आधुनिक भारताच्या इतिहासात भारतीय तरुण-मध्यमवर्ग-बुजुर्ग स्त्री-पुरुषांच्या मनावर सर्वार्थाने अधिराज्य गाजवणारी व्यक्तिमत्व दुर्मिळच! अशाच प्रकारच्या व्यक्तीमत्वांपैकी वीस-एकविसाव्या शतकांतील महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! जवळपास ८३ वर्षे त्यागपूर्ण आयुष्य जगलेले गुरुवर्य डॉ.कलामांचा जीवनपट सर्वांनाच थक्क करणारा आहे!             भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांच्या जगप्रसिद्ध अगीपंख (जडणघडण) या आत्मचरित्रातील काळजी नको, क्षोभ नको, खंत नको संधीची नुकतीच कुठे सुरुवात आहे सर्वोत्तम ते अजून सुरु व्हायचे आहे अजून मी सर्वोत्तम केलेले नाही! ओळी त्यांची दुर्दम्य इच्छाश...

मैत्र जिवाचे...!

Image
  मैत्र जिवाचे...!       माणूस हा भावनाशील प्राणी आहे. भावनांचे बीज पेरत जीवन फुलवीत जाणारा माणूस जगभर संचरला आहे. यातूनच एक घट्ट धागा विणला गेला आहे आणि तो कोमल, सुंदर , हृदयंगम धागा म्हणजे मैत्री! आत्तापर्यंत आणि इथून पुढेही मैत्रीवर अनेक कथा, कादंबरी, काव्य, नाटके निर्माण झाली, होत राहतील! मैत्रीची अनेक उदाहरणे जगणे पहिली आहेत. स्वतःपेक्षाही मित्राची काळजी घेणारे मित्र आणि त्यांच्याद्वारे मैत्री अजरामर झाली आहे. मैत्री म्हणजे समर्पण! मैत्री म्हणजे नवजीवन! मैत्री म्हणजे श्वास आणि उच्छवास! आत्तापर्यंत मैत्रीनेच जग जुडले आहे. सत्ता, संपत्ती, वय, जात, धर्म, पंथ, लिंग, देश इत्यादींच्या पलीकडे एक अलौकिक भावनाविष्कार म्हणजे मैत्री! मैत्री म्हणजे आधार! मैत्री म्हणजे शुद्धता, निर्मळता! मैत्री प्रेमाच्याहि पलीकडचे अवीट नाते. मैत्री, जिथे सर्व मानवी बंध अनिर्बंध होऊन ओसंडून वाहतात तेथून मैत्रीचा निखळ प्रवाह वाहत असतो.       मैत्रीवर अनेकांनी आपले अनमोल, चिंतनगर्भ शब्द खर्च करतांना जीवनात मैत्रीला अनन्यसाधारण महत्व दिलेले आढळून येते. स्व...

उसवण: गरिबी, सत्वशील जीवनाचा विदारक दाह!

Image
समीक्षण युवा साहित्य अकादमी २०२४ पुरस्काराने सन्मानित कादंबरी... उसवण ---श्री देविदास सौदागर प्रकाशक:  देशमुख अँड कंपनी लि.पुणे उसवण: गरिबी, सत्वशील जीवनाचा विदारक दाह!                 अक्षरे माणसाला अस्वस्थ करतात. प्रत्येकामध्ये विचार लाव्हा खदखदत असतो. त्यात एकीकडे काही माणसं स्वतःशी संवाद करतात, तासंतास मोबाईलच्या निर्जीव, गुळगुळीत काचेसोबत व्यर्थ खेळत असतात. दुसरीकडे चिंतनशील माणसं सरळ लेखणी उचलतात आणि आपल्या मनातलं लिहायला बसतात. लेखन हे सहजासहजी होत नाही. खळबळ, मध्ये भरपूर साठलेलं, इतरांना सांगायचं राहिलेलं असतं आणि त्यातूनच ते भडभडून बाहेर येतं. आज मोबाईल-मीडियामुळे नवनवीन लिहिणारे लोक माहित होऊ लागले, नवलेखकांचे समूह तयार झाले. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत निघाली. मी मी म्हणणाऱ्यांना मिडीयावर यावे लागले. लेखन क्षेत्रातील ही नव क्रांतीच म्हणावी लागेल! यातून दिवसेंदिवस दर्जेदार वाङ्मय निर्माण होत आहे, ते प्रकाशात येत आहे. नव्या लेखकांची ओळख होत आहे. नवनवे लोक वाचत, लिहीत आहेत. त्यातूनच कालपरवा तुळजापूर येथील टेलर, कविवर्य ...

कृतीशील समाजसुधारक श्री संत भगवानबाबा

Image
कृतीशील समाजसुधारक श्री संत भगवानबाबा             "तैसा व्यासाचा मागोवा घेतु" या संत ज्ञानेशांच्या प्रेमानुभूतीनुसार जेष्ठ-श्रेष्ठांचा मागोवा घेऊनच जीवनाची खडतर वाट सुकर करण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित आहे. आधुनिक काळात अनेक सामान्यांतील सामान्य माणसांनीच असामान्य इतिहास घडवला आहे ! आजमितीला कुणीही कुणाला तुच्छ लेखू नये अथवा आत्मक्लेश करून घेऊ नये. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये, दिवटीच्या आंगीं थोरी   |   तरी ते बहु तेज धरी   | वाती आपुलिया परी   |   आणीच कीं ना   ?   ॥ ह्या ओव्यांच्या द्वारे दिवटी असो की वात, आपापल्या परीने प्रकाश देण्याचे कार्य करत असते असा उपदेश करतात. याच न्यायाने महाराष्ट्राच्या दुर्गम, मागास आणि उसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सामान्य कुटुंबात कृतीशील समाजसुधारक राष्ट्रसंत भगवानबाबांचा जन्म झाला. बीड जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील विविध नद्यांच्या उगम-संगमावरील सुप्पे सावरगावात श्रावण वद्य पंचमी, शके 1818 (29 जुलै, 1996) सोमवार रोजी सूर्योदय समयाला सौ.कौतीकाबा...

गीता-ज्ञानेश्वरी का वाचावी?

Image
गीता-ज्ञानेश्वरी का वाचावी? " गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे ? का वाचली पाहिजे गीता ज्ञानेश्वरी? असे एक ना  अनेक प्रश्न सखीने विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.             " विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल." सखीने उदार मनाने मला सवलत दिली.       मी म्हणाले , " गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने , तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने , अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. "                 सखी: "उदाहरण दे." हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून , मनात ठेवून मी म्हटले ," भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते ?"             सखी: "कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो."  ...

म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे...!

Image
  म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे...         विस्तीर्ण, विशालकाय पसरलेल्या पर्वतावरील एकाकी पडलेल्या पाषाणाला एक शिल्पकार आपल्या छन्नी-हातोडा आणि अलौकिक कल्पकतेच्या सहाय्याने मूर्तीचे रूप देऊन मंदिरात केवळ पूजा करण्यायोग्य बनवत नाही, तर त्या दगडामध्ये लाखो ज्ञानी-प्रज्ञावंत माणसांना त्यांच्या जागृत श्रद्धा आणि यशासाठी सजीव प्रतिक निर्माण करतो ! हाच खरा गुरु ! हेच गुरुचं खरं गुरुत्वाकर्षण ! गुरुचं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षाही जास्त प्रवाही, जे जीवनातील कण-कण आणि क्षण-क्षण व्यापून टाकतं ! यामुळेच कि काय, कुणी कितीही महान-प्रतिभावंत-श्रीमंत-गुणवंत आणि कोणत्याही पदांवर विराजमान असला तरी क्षणार्धात गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो ! गुरु नेमकं आपल्या शिष्याला काय देतो बरं ? हा मोठा कळीचा प्रश्न आहे. याचं उत्तर म्हणजे, गुरु शिष्याला काहीच देत नसून केवळ शिष्यातील लघुतत्व संपवतो आणि त्यालाच गुरुस्थानी विराजमान करतो ! तोच खरा गुरु ! गुरु म्हणजे कुणी कानात फुंकणारा, बंदिस्त करून लोकांना गुह्य ज्ञान सांगणारा नसून 'गुह्य लोकांती प्रकट करणारा'च खरा...