तुकाराम बीज विशेष: जगद्गुरू तुकोबांचा अमृतोत्सव!
जगद्गुरू तुकोबांचा अमृतोत्सव! स्वतःचे मरण डोळ्याने पाहून आपल्या संघर्षशील जगण्याचा अमृतोत्सव साजरा करणारा एकमेवाद्वितीय संत कवी म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम! संसारात राहून, भोवतालच्या माणसांशी वागून अभंग-कीर्तनातून लोकव्यवहार कथन करणारा सामान्यातील असामान्य महापुरुष तुकोबाराय! जेमतेम बेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभेलेले तुकाराम काय काय लिहून-बोलून जातात? समोरील आव्हानांचा भलामोठा पहाड आणि संघर्षातून दिलेली उत्तरे म्हणजे तुकारामोत्तर लोकांच्या जीवनाला अजीवन पथगामी ठरणारी आहेत. सतरावे शतक, कडेकोट वर्णव्यवस्था यातून मोठ्या कौशल्याने मार्ग काढत तुकोबा पुढे जातात. आपले अभंग बुडविले तरी कुणालाही एक शब्द न बोलता ज्यांच्यासाठी लिहिले होते त्यांच्याकडेच जाऊन आपली कैफियत मांडतात. त्यांचे अभंग खऱ्या अर्थाने अभंगच राहिले, कारण ते लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले. आलेले अनुभव सरळ, साध्या लोकभाषेत कथन करून समाजमंथन करण्याचे महत्कार्य तूकोबांनी केल्यामुळेच जनसागराच्या मनपटलावर अभंग तरले आणि त्यानंतर खराखुरा तुक...